शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या.

Advertisement

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या.

सूर्य संपूर्ण महाराष्ट्रात आग ओकत आहे, लोकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे, मुबई, ठाणे, भारतीय हवामान विभागाने या वर्शिसाठी काही दिलासादायक बातमी दिली आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्विण्यात आली आहे. देशात 106 टक्के पावसाची शक्यता असून, हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी (15 एप्रिल ) पावसाच्या पॅटर्नची नेमकी माहिती दिली आहे. भारतीय हवामान खात्याची पहिली शैली परिपत्रक आले आहे. या वर्षी मान्सून नेहमीपेक्षा जास्त तीव्र असणार आहे. या वर्षी फक्त महाराष्ट्रातच मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला असून, महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडेल असे संकेत IMD ने दिले आहेत. महापात्रा म्हणाले, की या वर्षी नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडतोय असा अंदाज आहे. 5 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. नेहमीपेक्षा परिस्थिती चांगली आहे. मान्सून 8 जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. एल निनोची परिस्थिती सध्या प्रचलित आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर एल निनोचा प्रभाव जाणवू लागला. अल निनोचा प्रभाव कमी होत चालला आहे. दरवर्षी शेतकरी भारतीय हवामान खात्याच्या अंदाजाची वाट बघतात. हवामान काय करेल या विचाराची सर्व शेतकरी वाट पाहत आहेत. अखेर काल हवामान विभागाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाचा पहिला दीर्घकालीन दृष्टिकोन हा आहे. पुढील सुधारित पावसाचा अंदाज महिन्याच्या अखेरीस जाहीर करण्यात येईल. त्यानंतर मान्सूनशी संबंधित चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

please disable Adblock to proceed to the destination page