टीम कृषी योजना / Krushi Yojana
सध्या भारतात पावसाचा हंगाम (Monsoon season) आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही भागात मान्सूननं हजेरी लावली त्या नंतर मान्सूननं ऊन सावली चा खेळ सुरु केला. जून June 2021 महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शांत झालेला पाऊस ( Calm rain in the second week ) अजूनही राज्यात अपेक्षेप्रमाणे झाला नाही. राज्यात अनेक शेतकऱ्यांच्या (Farmers) पेरण्या राहिल्या आहेत. अशात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढत असताना दिसत आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभे ठाकले आहे.( Farmers are facing the crisis of double sowing.)
दोन आठवड्याच्या विश्रांती नंतर जुलै महिन्यात मान्सूनची राज्यात जोरदार वापसी होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आलीये. सुरुवातीचे दोन झाले, तरीही मान्सूनचा काही थांगपत्ता नाहीये. विदर्भा मधील काही जिल्ह्यात आभाळ दाटून आले आहे. पुणे जिल्हा व घाट परिसरात ढगाळ हवामान आहे. येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रात ,मराठवाडा व विदर्भ या तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कमी अधिक प्रमाणात कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सकाळपासून पुणे, सातारा व घाट परिसरात ढगाळ हवामानाची नोंद केली गेली आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून फेण्यात आली आहे. याठिकाणी आज मेघगर्जनेसह मध्यम व जोरदार स्वरुपाच्या पावसाची Haivy rain fall शक्यता आहे. पुणे, सातारा व काही भागात विजांसह पाऊस पडेल.
उत्तरेत मान्सून प्रवास धीम्या गतीने आहे, महाराष्ट्रात मान्सूनचं आगमान झाल्यावर पुढील दोन आठवड्यातच मान्सून संपूर्ण देशभर जाण्याची शक्यता होती.उत्तरेकडून मान्सून प्रवास केल्यावर मान्सून रेंगाळला आहे. उत्तरभारतात उष्णतेत वाढ होत आहे. दिल्लीत 44 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. दरवर्षी जुलै महिन्यात दिल्ली मध्ये तापमान 37-38 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते. परंतु मान्सून गायब झाल्यानं दिल्लीत सरासरीपेक्षा अधिक 7 अंश सेल्सिअस तापमान आहे.