Agriculture Electricity: राज्यात ‘शेती वीज बिल’ थकबाकी न भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज कापण्याचे आदेश.
महावितरणची (Mahavitran) आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे वीजबिल न भरणाऱ्यांसाठी वसुली थांबवने हा पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांची वीज खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे, महावितरणचे कार्यकारी संचालक विजय सिंघल यांनी सांगितले.
नागपुर मध्ये सिंगल यांनी शुक्रवारी (ता. 25) महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीस प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, पुष्पा चव्हाण, राजेश नायक, सुनील देशपांडे उपस्थित राहिले होते.
विजबिलाची थकीत बाकी हाच मुख्य मुद्दा या बैठकीत अजेंड्यावर होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.यावेळी सिंघल म्हणाले, “कंपनीची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. कंपनीवर प्रचंड आर्थिक बोजा(कर्ज) आहे. नवीन कायद्यांमुळे कर्ज घेण्याची क्षमता खूप कमी झालेली आहे.
त्यामुळे कंपनीच्या अस्तित्वासाठी वीज बिल जमा करणे अत्यावश्यक झाले आहे. घरगुती ग्राहक व शेती ग्राहक यांचा थकीत विजबिलाचा आकडा खूप मोठा आहे, त्यामुळे थकीत विजबिलाच्या बाकीसाठी वीज कनेक्शन कापण्याशिवाय इतर पर्याय नाहीये.
सध्या बिले भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित न करण्याची सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे.चालू वीजबिल भरणाऱ्यांना सोडून इतरांचा शेताचा वीजपुरवठा बंद करा,असे आदेश देण्यात आले असल्याचे सिंघल यांनी सांगितले.
शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या. सूर्य संपूर्ण महाराष्ट्रात… Read More
ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक… Read More
Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव! Kapus Bajar Bhav : महाराष्ट्रातील कापसाचे बाजार… Read More
कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान. जाणून घ्या कापसाची नवीन… Read More
ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय. Substantial subsidy for cultivation of… Read More
जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम. Farming Tips:… Read More
This website uses cookies.