टीम कृषी योजना / Krushi Yojana
दरवर्षी शेतात काबाडकष्ट करून शेती करून देखील शाश्वत उत्पन्न मिळेल याची खात्री नसते,कांदा पीक घेणारे अनेक शेतकरी आहेत,प्रामुख्याने महाराष्ट्रात कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते,पिकवलेला कांदा पारंपरिक पद्धतीने साठवून दरवाढ झाल्यावर विक्री करून अधिक पैसा मिळवला जातो परंतु शेड मध्ये,कांदा चाळीत कांदा किती दिवस टिकेल हे कांद्याच्या प्रतवारी व वातावरणावर अवलंबून असते.
पारंपरिक पद्धतीने केल्या गेलेल्या या शेतीमुळे, पिकाची साठवण यामुळे शेतकऱ्याला अनेक वेळेस तोटा होतो.परंतु शेतीत विविध प्रयोग करणारे अनेक शेतकरी आपण बघतो,वेगळ्या प्रयोगाने हे शेतकरी नक्कीच यशस्वी होत असतात. आज आपण अश्याच एका आधुनिकतेची कास धरून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती बघणार आहोत.
शेतकरी कांदाचाळी मध्ये कांदा साठवतात. शासनाकडून कांदा चाळी साठी अनुदान दिलं जातं.
परंतु ‘ या ‘पद्धतीने कांदा साठवल्याने कांदा खराब होण्याचे प्रमाणही अधिक आहे.
परंतु यावर एका शेतकऱ्याने नवीन उपाय शोधला आहे.यामुळे शेतकरी आपला कांदा अधिक दिवस टिकवून ठेऊ शकतात. ( New method of onion storage; Onion lasts for two years The new method, said the farmer )
दोन वर्षे कांदा टिकवण्याची पद्धत ( Method of preserving onion for two years ) शोधून काढणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे सुमेर सिंग. सुमेर हे हरियाणा मधील भिवानीतील ढाणी माहूत येथे वास्तव करतात.
कांदा साठवणुकीसाठी त्यांनी शेतकऱ्याना कमी खर्चात व कांदा जास्तीत जास्त महिने टिकेल असा उपाय सांगितला आहे.
सुमेर सिंग या शेतकऱ्याकडे शेतात एक शेड आहे. यामध्ये त्यांनी कांदे कापडी दोरीने बांधून ठेवले आहेत. सुमेर सिंग सांगतात की “कांदा विक्रीसाठी पोत्यात भरून पोते एकावर एक ठेवले जातात. कांदे उष्ण असल्यामुळे दाब वाढून कांदे खराब होत असतात. एक जरी कांदा खराब झाला तर इतर कांदेही खराब होऊ लागतात.
परंतु या पद्धवतीने कांदा साठवल्याने खराब होण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे.
शेतकरी सुमेर सिंग यांनी शेतात सेंद्रीय पद्धतीने कांद्यांचं उत्पादन घेतलं असून सेंद्रिय पद्धतीने कांदा अधिक टिकतो असे ते सांगतात.
महत्वाची बातमी – कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता ; या कारणामुळे होऊ शकते वाढ
कांदाकाढल्या वर शेतकरी सुमेर यांनी कांदे पातीसह एकत्र करून बांधले. ते कांदे शेतातील शेडमध्ये दोरीने टांगून ठेवले आहेत. जसा लसूण शेड मध्ये लटकून ठेवला जातो. या पद्धतीच्या वापराने कांदा टिकतो खराब होत नाही.
शेती करत असताना “सेंद्रीय शेती , रासायनिक शेती दोन्ही प्रकारात जोखीम असते. म्हणून शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग करायचेच नाहीत का.? सर्व शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती चा प्रयोग करावा.असे शेतकरी सुमेर सिंग यांनी सांगितले.
योजनेची माहिती नक्की पहा – कांदा चाळ अनुदान योजना 2021 | योजनेची संपूर्ण माहिती व मार्गदर्शन
शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या. सूर्य संपूर्ण महाराष्ट्रात… Read More
ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक… Read More
Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव! Kapus Bajar Bhav : महाराष्ट्रातील कापसाचे बाजार… Read More
कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान. जाणून घ्या कापसाची नवीन… Read More
ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय. Substantial subsidy for cultivation of… Read More
जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम. Farming Tips:… Read More
This website uses cookies.