टीम कृषी योजना /Krushi Yojana
मान्सूनची आतुरतेने शेतकरी वाट बघत असतात परंतु तो कधी चांगला बरसतो तर कधी शेतकऱ्यांना वाट बघायला लावतो. हवामान विभाग सतत अंदाज वर्तवतो परंतु तो पूर्णतः खरा ठरतो असे नाही. परंतु आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हवामान विभागाकडून चार ठिकाणी नवीन रडार यंत्रणा बसवण्यात येणार आहे ( The meteorological department will install new radar systems at four locations ) रत्नागिरी, बोरिवली, कर्नाटक मधील मंगळुरू या ठिकाणी नव्या रडार यंत्रणा बसवण्यात येणार आहेत. हि रडार यंत्रणा 100 किलोमीटरच्या परिसरात हवामानाचा अंदाज वर्तवला जाईल. हि रडार यंत्रणा 100 किलोमीटरच्या परिसरातील हवामानाचा वेध घेईल. ( This radar system will monitor the weather within a radius of 100 km. )
किसान क्रेडिट कार्ड द्वारे कर्ज प्रक्रिया झाली अगदी सोपी | 3 लाखांचं कर्ज अल्प व्याजदरात मिळणार
हवामान तज्ञ ‘पंजाब डख’ यांचा नवा हवामान अंदाज | 15 जून ते 22 जून | संपूर्ण महाराष्ट्र अंदाज.
हवामानाचे अंदाज आणखी अचूकरित्या वर्तवण्यासाठी राज्यातील चार ठिकाणी रडार यंत्रणा लावण्यात येणार आहे. एक रडार मुंबईच्या बोरिवली परिसरात बसवण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईत पावसाचा (Rain) अंदाज अधिक अचूकरित्या वर्तवला जाईल. त्यानुसार मुंबई आणि कोकण परिसरात चार रडार यंत्रणा बसवण्यात येणार आहेत. आयआयटीएम या संस्थेतर्फे ही रडार बसवली जातील.
तर हवामान खात्याकडून रत्नागिरी, बोरिवली तसेच कर्नाटकातील मंगळुरू या परिसरात नव्या रडार यंत्रणा लावण्यात येतील. मराठवाडा तसेच पश्चिम किनारपट्टीवर रडार यंत्रणा मजबूत करण्याचा हवामान विभागाचा प्रयत्न आहे.