Bhausaheb Fundkar Falbaag Lagwad Yojana: Assistance to farmers from 50 thousand to 1 lakh in orchard planting scheme, government will provide financial assistance for three years
टीम कृषी योजना /Krushi Yojana
Bhausaheb Fundkar Falbaag Lagvad Yojana Full Details
शेतकऱ्याची आर्थिक उन्नती व्हावी त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून राज्य सरकार नेहमी प्रयत्न करतं असत. केंद्र सरकारचे देखील या दृष्टीने प्रयत्न सुरू असतात. अल्प भूधारक व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या साठी महाराष्ट्र राज्य सरकारनं 2018-19 या वर्षा पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु केली असून अनेक शेतकऱ्यांनी आज पर्यंत या योजने पासून लाभ घेतला आहे,घेत आहेत.
राज्य सरकारने 2018 – 19 या वर्षात सुरु केलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्याकडे कमीत कमी 20 गुंठे जमीन असणं आवश्यक आहे. कोकणा तील शेतकऱ्यांसाठी ही अट शिथील करण्यात आली असून कोकणात शेतकऱ्यांना 10 गुंठे जमीन असली तरी या योजनेचा लाभ घेता येतो. कोकणात जास्तीत जास्त जमीन मर्यादा 6 हेक्टर असून महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यात ही मर्यादा 10 हेक्टर पर्यंत ठेवण्यात आली आहे. योजनेत पात्र लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यास त्याच्या क्षेत्रात विविध फळपिकांची लागवड करता येते. परंतु मुख्य अट ही आहे की आज पर्यंत राज्य सरकारच्या कुठल्याही फळबाग योजनेंचा लाभ घेतला असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेला लाभ घेता येत नाही.
शेतकरी स्वतः भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी अर्ज करु शकतो. शेतकऱ्याच्या नावावर 7/12 उतारा असणं बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्याचं कुटुंब केवळ शेतीवर अवलंबून आहे अश्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिलं जात. अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक, महिला तसेच दिव्यांग व्यक्ती यांना या योजनेत प्राधान्य दिले जाते.
खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे यासाठी राज्य शासन अर्धसहाय्य करते. या योजनेअतंर्गत फळबाग लागवड करायची असल्यास 1 मे ते 30 नोव्हेंबर च्या दरम्यान करावी लागते. योजना यशस्वी होण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारीस विभागीय कृषी सहसंचालक, कृषी आयुक्तालय, रोपवाटिकाधारक यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
काजू, डाळींब,मोसंबी, कांदी लिंबू, सिताफळ,नारळ, आवळा, जांभूळ, फणस,संत्रा, अंजिर,चिकूस, आंबा, कोकम,पेरू,चिंच इत्यादी झाडांचा समावेश आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी शेतकऱ्यांना एकूण तीन टप्प्यात अनुदानाची रक्कम दिली जाते. पहिल्या वर्षी 50 टक्के, दुसऱ्या वर्षी 30 आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. फळपिकानुसार अनुदानाची रक्कम बदलत असते.
शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या. सूर्य संपूर्ण महाराष्ट्रात… Read More
ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक… Read More
Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव! Kapus Bajar Bhav : महाराष्ट्रातील कापसाचे बाजार… Read More
कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान. जाणून घ्या कापसाची नवीन… Read More
ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय. Substantial subsidy for cultivation of… Read More
जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम. Farming Tips:… Read More
This website uses cookies.