Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the fast-indexing-api domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/krushiyo/public_html/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the health-check domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/krushiyo/public_html/wp-includes/functions.php on line 6121
Kanda Bajar Bhav: होय हे खरं आहे... लवकरच कांदा गाठणार 5 हजारांचा टप्पा, अतिवृष्टीमुळे अडीच लाख हेक्टर क्षेत्रावरील कांदा पिकाला बसला फटका - krushiyojana.com
Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

Kanda Bajar Bhav: होय हे खरं आहे… लवकरच कांदा गाठणार 5 हजारांचा टप्पा, अतिवृष्टीमुळे अडीच लाख हेक्टर क्षेत्रावरील कांदा पिकाला बसला फटका

Kanda Bajar Bhav: होय हे खरं आहे… लवकरच कांदा गाठणार 5 हजारांचा टप्पा, अतिवृष्टीमुळे अडीच लाख हेक्टर क्षेत्रावरील कांदा पिकाला बसला फटका

डिसेंबर-जानेवारीत कांद्याचे भाव वाढणार! परतीच्या पावसामुळे अडीच लाख हेक्टरवरील शेती घटली आहे, राज्यात दरवर्षी खरीप आणि उशिरा खरीप हंगामात 4.5 ते 4.5 लाख हेक्टर क्षेत्रात कांद्याची लागवड केली जाते. परंतु, यावर्षी अतिवृष्टीमुळे लागवडीखालील क्षेत्र सुमारे अडीच लाख हेक्टरने घटले आहे. आता रब्बीमध्ये कांदा लागवडीची तयारी सुरू आहे. त्यामुळे डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यांत कांद्याचे भाव Onion Price पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचतील, असा अंदाज फलोत्पादन विभागाने वर्तविला आहे.
राज्याच्या एकूण कांदा उत्पादनापैकी 70 टक्के एकट्या नाशिक जिल्ह्याचा वाटा आहे. त्यानंतर अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांचा नंबर लागतो, हे जिल्हे कांदा उत्पादनात आघाडीवर आहेत. परंतु, जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. कांद्याची पिक उद्ध्वस्त झाली आणि जमिनीतील ओलावा लवकर कमी झाला नाही. त्यामुळे खरीप आणि उशिरा कांद्याच्या लागवडीत मोठी घट झाली. गेल्या वर्षी खरीप आणि उशिराने 3 लाख 59 हजार हेक्‍टरवर कांद्याची पेरणी झाली होती. परंतु, यंदा केवळ एक लाख 19 हजार हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. 15 नोव्हेंबरनंतर सुरू होणाऱ्या रब्बी हंगामात कांद्याची लागवड वाढेल, असा अंदाज उद्यान विभागाने वर्तवला आहे. गतवर्षीचा कांदा सुमारे अडीच लाख टन असेल आणि पावसामुळे कांद्याला मोठा फटका बसला आहे. पुढील दोन महिने कांद्याचे भाव आणखी वाढतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कारण, आता लावलेला कांदा फेब्रुवारीत येणार आहे. सध्या कांद्याचा भाव दोन ते अडीच हजार रुपये प्रतिक्विंटल आहे.

कांदा लागवडीची सद्यस्थिती

खरीप लागवड : 90,000 हेक्टर
उशिरा खरीप लागवड: 29,000 हेक्टर
रब्बीमध्ये अंदाजः 4.50 लाख हेक्टर
सध्याचा दर प्रति क्विंटल : 2300 ते 2600

साठेबाजीवर लक्ष ठेवणार

काही लोक कांद्याचे लागवडीखालील क्षेत्र, अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान आणि कांद्याची सध्याची शिल्लक याचा अंदाज घेऊन सध्या उपलब्ध कांदा साठवून ठेवतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कांद्याच्या दरात मोठी उसळी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर फलोत्पादन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साठेबाजीवर लक्ष ठेवले जाणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Don`t copy text!