Advertisement

शेतकरी पुन्हा उतरणार रस्त्यावर, १७ जूनला राज्यभर मोर्चे

Advertisement

 

टीम कृषी योजना/krushi yojana

Advertisement

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्यभर लॉकडाऊन लावला गेला होता याचाच फायदा घेऊन अनेक दूध संघांनी दुधाचे भाव कमी केले (पाडले) असा आरोप दूध उत्पादकांनी केला आहे.याच्याच निषेधार्त राज्यभर पुन्हा आंदोलन पुकारले गेले असून. यासाठी तारीख देखील निश्चित झाली असून या महिन्यातील १७ जून रोजी राज्यभरातील सर्व तहसिल कार्यालयावर मोर्चे काढण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला असल्या बाबतची माहिती भारतीय किसान सभेचे सरचिटणीस व शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.

महत्वाची योजना नक्की पहा – पैसे नसले तरीही जमीन खरेदी करू शकता | या योजनेद्वारे व्हा जमिनीचे मालक.

Advertisement

या आंदोलना बाबत माहिती देताना डॉ.नवले यांनी सांगितले. लॉकडाउनच्या काळात दुधाची मागणी कमी झाल्याचे कारण देत खासगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर तब्बल दहा ते पंधरा रुपये प्रति लिटरने कमी केले.खेडेगाव व शहरातील ग्राहकांना असलेले विक्रीदर मात्र जैसे थे ठेवत दूध उत्पादक शेतकरी व ग्राहकांची लूट केली जात आहे. किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने याविरोधात राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.नैऋत्य मान्सूनचे आगमन झाले आहे, खरीप हंगामाची कामे देखील सुरू झाली आहे.असे असताना राज्य सरकारने हंगामाच्या तयारीकडेही अक्षम्य दुर्लक्ष चालवले आहे, शेतकऱ्यांना आत्तापासूनच खतांची तीव्र टंचाई भासू लागली आहे. अनेक ठिकाणी खतांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.वाजवी दराने खते विकत घ्यावी लागत आहेत तर अनेक ठिकाणी खतांचे लिंकिंग केले जात असल्याची बाब समोर आली आहे. केंद्र सरकारने डिझेल, पेट्रोल आणि गॅसचे दर प्रचंड प्रमाणात वाढवले आहेत. कोरोना काळात आलेली मोठं मोठी विजबिले भरणे अशक्य होत आहे.सर्वच बाजूंनी शेतकरी मेटाकुटीला आला आहे. केंद्र व राज्य सरकारचे या प्रश्नांकडे लक्ष वेधून तातडीने कारवाई होण्यासाठी १७ जून रोजी राज्यभरातील सर्व तहसिल कार्यालयांवर मोर्चे काढत निदर्शने करण्याचा निर्णय किसान सभेच्या राज्य काउन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे नवले यांनी सांगितले.

महत्वाची माहिती नक्की वाचा – पिक विमा मंजूर झाला की नाही पहा तुमच्या मोबाईल वर | सोपी पद्धत | बँकेत,कृषी कार्यालयात जाण्याची गरज नाही.

Advertisement

राज्यभरातील तहसील कार्यालयांवर कोरोनाचे नियम पाळत करण्यात येत असणाऱ्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांनी केले आहे.

Advertisement
कृषी योजना

Recent Posts

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या.

शेतकऱ्यासाठी आनंदवार्ता, पाऊसाची चिंता संपली, यावेळी महाराष्ट्रात किती पाऊस पडणार, जाणून घ्या. सूर्य संपूर्ण महाराष्ट्रात… Read More

3 weeks ago

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक कसे वाचवायचे.

ऊस पिकात झपाट्याने होतोय, ब्लॅक बग या रोगाचा प्रादुर्भाव, जाणून घ्या या रोगापासून उसाचे पीक… Read More

3 weeks ago

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव!

Kapus Bajar Bhav 2024: महाराष्ट्रातील आजचे कापसाचे बाजारभाव! Kapus Bajar Bhav : महाराष्ट्रातील कापसाचे बाजार… Read More

3 weeks ago

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान.

कापसाची नवीन जात, एकरी देते 14 क्विंटल पर्यंत उत्पादन, शेतकऱ्यांसाठी वरदान. जाणून घ्या कापसाची नवीन… Read More

3 weeks ago

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय.

ऊस व या पिकाच्या लागवडीसाठी मिळणार भरगोस अनुदान, महत्वपूर्ण निर्णय. Substantial subsidy for cultivation of… Read More

3 weeks ago

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम.

जिरायत आणि नापीक जमिनीही होणार पूर्णतः बागायत, शेतकऱ्यांना करावे लागेल फक्त एवढं काम. Farming Tips:… Read More

3 weeks ago

This website uses cookies.