Google News

आमचे ताजे अपडेट्स Google News वर वाचा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना | घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी

 

टीम कृषी योजना / Krushi Yojana

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त राज्यातील अनुसुचित जाती, जमाती प्रवर्गातील व्यक्तींचे जीवन प्रकाशमान करण्याच्या दृष्टीने ‘जीवन प्रकाश योजना’ वीज जोडणीची विशेष मोहिम दि.१४ एप्रिल २०२१ ते दि.६ डिसेंबर २०२१ या कालावधीत राज्यात राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ( Dr. Babasaheb Ambedkar Jeevan Prakash Yojana Power connection for domestic customers. )

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेच्या द्वारे अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीच्या असंघटित उद्योगामधील वीज पुरवठयासंबधी असणा-या तक्रारी/ समस्यांचे निवारण करण्यात येणार आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरजीवन प्रकाश योजने साठी पात्रता व आवश्यक कागदपत्रे.

आधार कार्ड

रहिवासी दाखला

लाभार्थी अर्जदाराकडे जाती प्रमाणपत्र असायला हवं.

अर्जदाराकडे यापूर्वीची महावितरणची थकबाकी नसावी.

लाभार्थ्यास रू.५००/- एवढी अनामत रक्कम महावितरणकडे जमा करावी लागेल.

ही रक्कम ५ समान मासिक हफ्त्यांमध्ये भरण्याची सुविधा आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारास महावितरणच्या विहित नमुन्यात कागदपत्रासह ऑनलाईन अथवा ऑफ लाईन अर्ज करता येतो.

अर्जदाराने शासनमान्य विद्युत कंत्राटदारांकडून वीज मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडावा लागेल.

अर्जदारांचा परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर मा.महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या या संदर्भातील अस्तित्वात असणा-या तरतुदीच्या अधीन राहून वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल.

महावितरणद्वारे प्राप्त अर्जानुसार ज्या अर्जदाराच्या घरी वीज जोडणी नाही अशा लाभार्थ्यांना विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील १५ कार्यालयीन दिवसात वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल.

तसेच जेथे अर्जदारास वीज जोडणीकरीता विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध करावी लागणार असल्यास अशा ठिकाणी महावितरणद्वारे स्वनिधी अथवा जिल्हा नियोजन विकास निधी (विशेष घटक योजना तथा आदिवासी उपयोजना सहीत) अथवा इतर उपलब्ध होऊ शकणाऱ्या निधी मधून प्राधान्याने हाती घेऊन पूर्ण करण्यात येईल व वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल.

वरील माहिती आवडल्यास इतरांना नक्की पाठवा.

Leave a Reply

Don`t copy text!