टीम कृषी योजना / krushi Yojana
कापसावर होणारा बोंडअळीचा प्रार्दूभाव टाळण्यासाठी १५ जून नंतर जेव्हा जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होईल त्यानंतर कापसाची लागवड करावी असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.
गुलाबी बोंडअळीच्या पिढीचा अन्नपुरवठा खंडित होण्यासाठी पूर्वहंगामी कापसाची लागवड सर्व शेतकऱ्यांनी टाळणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आलेले आहे.
कापूस हे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात प्रामुख्याने घेतले जाणारे पीक आहे. नांदेड ,हिंगोली ,परभणी ,जालना,बीड,औरंगाबाद ,उस्मानाबाद व लातूर,यवतमाळ,अमरावती,अकोला,बुलडाणा,वाशीम,वर्धा,नागपूर,व चंद्रपूर,जळगाव , धुळे, नंदुरबार,अहमदनगर व सातारा या जिल्ह्यात घेतले जाते.
ठिबक सिंचन व सुक्ष्म सिंचन सुविधेच्या सहाय्याने बागायती क्षेञातील बहुतांश शेतकरी पुर्व हंगामी कापुस या पिकाची २५ मे ते ७ जून दरम्यान लागवड करत असतात. २०१७ च्या हंगामा मध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला होता. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्यामागे विविध कारणे आहेत.या गुलाबी बोंड अळी चा प्रादुर्भाव वाढण्यामागे हंगामा पूर्वी कापसाची लागवड हे एक कारण आहे. हंगामा पूर्वी जर कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्यास गुलाबी बोंडअळीचे सुप्तावस्थेतील कोश व त्यातून निघालेल्या पतंगांना लवकर अन्न मिळते. सुरुवातीपासून खायला मिळाल्यामुळे त्याचप्रमाणे पूर्व हंगामी कापसाला फुलोरा येण्याची वेळ व गुलाबी बोंड आळी च्या सुप्त अवस्थेतून निघालेले पतंग यांची अंडी घालण्याची अवस्था यांचा कालावधी जुळल्याने गुलाबी बोंडअळीची पहिली पिढी त्या क्षेत्रात वाढते व पुढे वाढलेली पिढी इतर शेतकऱ्यांच्या शेतावर प्रादुर्भाव करते.
या खरिपाच्या हंगामात एक जूनपासून कापूस पिकाच्या बियाण्याची विक्री सुरु झाली आहे. एका आठवड्यापासून राज्यातील काही भागांमध्ये पूर्व मोसमी पाऊस झाला त्यामुळे काही शेतकऱ्यांची लागवडीसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. परंतु हा मान्सून पूर्व पाऊस लागवडीसाठी पुरेसा नाहीये. गडबड करून कपाशीची लागवड केली अन पुढे पाऊसाचा मोठा खंड जर पडला तर अनेक अडी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी १५ जून नंतर व कमीतकमी १०० मिलिमीटर पाऊस होऊन जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच कापूस पिकाची लागवड करणे योग्य होईल असे कृषी विभागाने सांगितले आहे.